रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

"शोध"-
धुलाक्षरे गिरवता गिरवता,
कधी पोहचले पुस्तकांच्या राज्यात ,
कललचं नाही..।
अंकलिपीच्या राज्यातून,
शब्दांच्या दुनियेत पाय ठेवला 
अन खुले झाले आकाश 
माझेचं मला..।
शब्दांच्या अनेक छटा भाव,
क्षितीज्यापल्याडचा अर्थ..
ओन्जल भरुन देत आहे,
जीवनाला अर्थ..।
तिथपासून इथपर्यंतचा प्रवास 
अगदीचं विभीन्न..
कधी अडखलून पडतांना,
शिकले सावरायला राहून प्रसन्न..।
गोष्टी,कथा,कोडी,विनोद,कांदबर्र्या,नाटके चरित्रे,विचारशिल्पे.
.वाचता वाचता वाचू लागले माणसे,
माणसांचे चेहरे,त्यांची मने..।
अन आता शोधतेय स्वतःचं स्वतःला,
अनिमीष..अविरत अव्याहतपणे..।।
-रो

"पाऊस"-
तो असाचं असतो..
कधी रुसणारा,
कधी रडविणारा..।
पण खात्रीने,
एकदा तरी बरसणारा..
अन बरसला की,
ओलाचिंब करणारा..
अगदी मनाच्या चोरकप्प्यापर्यंत..।।
-रो..

कधी कधी वाटे,
फुकाचा आटापीटा हा 
फुकाचाचं संदेह..।
पाना फुलासारखाचं,
ओघलेलं आपलाही देह..।।
म्हणूनीया या देहाचे,
सोवले ओवले कशाला..।
इतरांना आनंद देत,
प्रत्येक क्षणास सजवा..।।
-रो..

समाधान.."
तू ऐकणार नाहीस माहीत असूनही,
सांगत असते पुन्हा पुन्हा..
कारण ध्यासचं घेतलायं ,
तुला घडविण्याचा..।।
काही ना काही शोधण्यासाठी,
तुझं धडपडणं..
वैतागून सारं काही ,
बाजूला फेकून देणं..
त्याचवेली माझ तुला ,
चुचकारतं रहाणं पुन्हा पुन्हा..।
कारण ध्यासचं.......।।
तुझं प्रश्नांचं भेंडोल,
उत्तरासाठी ते आशेनं पहाणं.'
तुझं उत्तर तुचं शोध',
 उठणार्या वलयांची ,
जाणीव आहे मला..
तुझ्या हरवण्याच्या नेमक्या जागाही,
ठाऊक आहेत मला..
तरीही नाही अडवत
, तुला आता पुन्हा पुन्हा..।
कारण ध्यासचं.......।।
तू शोध तुझी ,
स्‍वतंत्र वाट..
तू बनवं ,
तुझीचं पाऊलवाट..
काट्यांची असेल आता कदाचीत,
होईल हिरवीगार तुझ्या श्रमाने..
आनंद देईल तुलाही अन इतरांनाही..
तुझ्या उत्तूंग कतृत्वाने,
मिलेलं मलाही समाधान..।
कारण ध्यासचं......।।-रो.. 

.. 

"समर्पित प्रीती.." 
 आली आकाशाला दया,
घाली मायेची पाखर..।
निस्तेज म्लान धरतीला,
फुटे सृजनाचा अंकुर..।। १।।
वाराही खट्याल,
आलिंगन देवू पाहे..।
हलक्या गार झुलकीने,
वृक्ष वेली हेलकावे..।।२।।
मेघाने घातली साद,
बरस बरस बरसला..।
हातचे काहीही न राखता,
सहस्रकरांनी झुकला..।।३।।
शुर्चिभूत होवूनिया,
सृष्टीने दिला प्रतिसाद..।
दान पदरात झेलले ,
नको वाद प्रतिवाद..।।४।।
हसू फुटे किरणाला,
तोही हलके प्रकाशे..।
सात रंग घेवूनिया,
चित्र काढीतो आकाशे..।।५।।
समर्पित प्रीतीच्या,
नूतन खाणाखूणा..।
सजते नटते धरती,
म्हणूनिया पुन्हापुन्हा..।६।।
रो.

"ह्रदयीचा सूर.." 
नाहीचं जमायचं मला ,
दाटलेला मेघ होणं..।
जलधारा अडवून,
मनातल्या मनात कुढणं..।।१।।
धरती कशीही असो,
खडकाल अगर ओलेती..।
मी मात्र बरसणारं,
दिन अन राती..।।२।।
ज्याला भिजायचंय,
तो होईल धुंद..।
झेलूनी प्रत्येक थेंब,
सेवेल मृदगंध..।।३।।
नाही जोडायची मला,
खडकांशी नाती..।
जैसी त्यांची गती,
तैसेची प्रगती..।।४।।
येईल नवा पूर,
रुजतील बिजांकूर..।
गातील दिशा,
छेडूनी ह्रदयीचा सूर..।।५।।
-रो..

"प्रवासी.." 
ज्याची त्याची वाट वेगली,
ज्याचा त्याचा थांबा..।
 क्षणांचेचं सोबती सारे,
हलूचं गाठोडं बांधा..।।१।। 
 वेड्यावाकड्या वलनांना,
एकमेकांचा आधार..।
वलूनी जाता कोपरा,
उरात भरे कापरं..।।२।।
उतरणीच्या प्रवासाला,
असू द्या हातात हात..।
पायथ्याशी पोहचता,
टाकावी लागेल कात..।।३।।
 येईल वार्याची लाट,
घेवून जाईल दूर दूर..।
 अनंताचा सारे प्रवासी,
कशास हवी कुरबूर..।।४।।
-रो..