रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

"शोध"-
धुलाक्षरे गिरवता गिरवता,
कधी पोहचले पुस्तकांच्या राज्यात ,
कललचं नाही..।
अंकलिपीच्या राज्यातून,
शब्दांच्या दुनियेत पाय ठेवला 
अन खुले झाले आकाश 
माझेचं मला..।
शब्दांच्या अनेक छटा भाव,
क्षितीज्यापल्याडचा अर्थ..
ओन्जल भरुन देत आहे,
जीवनाला अर्थ..।
तिथपासून इथपर्यंतचा प्रवास 
अगदीचं विभीन्न..
कधी अडखलून पडतांना,
शिकले सावरायला राहून प्रसन्न..।
गोष्टी,कथा,कोडी,विनोद,कांदबर्र्या,नाटके चरित्रे,विचारशिल्पे.
.वाचता वाचता वाचू लागले माणसे,
माणसांचे चेहरे,त्यांची मने..।
अन आता शोधतेय स्वतःचं स्वतःला,
अनिमीष..अविरत अव्याहतपणे..।।
-रो

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ