सोमवार, १९ सप्टेंबर, २०११


'उगीचच..'
वाटत आपणही व्यवहारी 
अन गणिती बनावं,
सगळ कसं नीट
हिशेबात बसवावं,
नुसत व्याकुळ होऊन 
उगीचच स्वत:च स्वत:ला कशाला सतावाव..?

भावनांचे कढ काय
येतात अन जातात,
ऋतूंचे बहार जसे 
बहरतात अन ओसरतात,
उगीचच पापण्यांना कशाला तिष्ठत ठेवावं..?

संवेदनांची जाण असण
कधी खंजीर बनून जात,
मनाच्या हळव्याक्षणात 
 एकटेपणाची जाणीव करून देत,
उगीचच मनाला बेफामतेकडे कशाला झुकवाव..? 

खरचं वाटत कधी कधी आपणही,
व्यवहारी अन बनावं गणिती बनावं..!!!     

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ