शनिवार, १० सप्टेंबर, २०११


भावनांचे मनोरे..

असाही पाऊस येईल
असे कधीच नव्हते वाटले,
माझ्या हृदयातच जणू
काळे मेघ दाटले..

कोसळतो आहे सारखाच
पण पूर मात्र येत नाही,
गळती होतेय सारखीच
मुळीच कशी थांबत नाही..

नव्हते मागितले फार काही,
ओलावा क्षणाचाच मागितला
तो ही ह्या काळ्या मेघांनी,
पुरता झाकळून टाकीला..

भोगले शाप सारे,
हा ही   शाप भोगावा का?
मरतांना हृदयातूनच,
जगण्याचा उ:शाप  कशाला हा..?

नको कोंब जीवनाचा ,
वाहून गेले सारे 
सुंदर भावनांचे मनोरे,
जळून खाक झाले.. 

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ