मंगळवार, २४ मे, २०११


भेटी


प्रत्येकाला एक स्वप्न हवं असतं
जागेपणी पाहण्यासाठी,
अपूर्ण राहूनही,आनंद देण्यासाठी..

प्रत्येकाला एक ठिकाण हवं असतं 
हरवून जाण्यासाठी,
हरवूनही पुन्हा तिथूनच गवसण्यासाठी..

प्रत्येकाला एक प्रतिबिंब हवं असतं 
स्वत:त डोकावण्यासाठी,
आतल्या आवाजासह स्वत:ला निरखण्यासाठी..

प्रत्येकाला स्वरंग हवा असतो 
इंद्रधनुत मिसळण्यासाठी,
मिसळून पुन्हा निरभ्रतेकडे नेण्यासाठी..

प्रत्येकाला आकाश हवं असतं 
मुठीत सामावण्यासाठी,
स्वत:च नसलं तरी आपलं म्हणण्यासाठी 

प्रत्येकाला विसावा हवा असतो 
प्रतीष्टेच ओझ उतरवण्यासाठी,
ओझ उतरून खूप लहान  बनन्यासाठी..

प्रत्येकाला चांदण हवं असतं 
स्नेहात निथळण्यासाठी,
अंधाराचा संपवून प्रवास,प्रकाशाकडे नेण्यासाठी 

प्रत्येकाला हवं असतं असं काही काही
सर्वांनाच सर्व मिळतं असं होत नाही..

पुर्णत्वातही अपूर्णत्व ठेवितो तो ईश्वर पाही 
लीला त्याची अगाध ह्या जगती संपत नाही..

त्यालाही लागते कधीतरी पूर्णत्वाची आस 
पवित्रतेचे बंधन घालूनी नात्यात गुंफितो ध्यास..

त्याची आस त्याचा ध्यास होतो त्याचाच श्वास 
भेटी घडवितो भाग्यवंताच्या तोच भूवरी खास..
         तोच भूवरी खास..
     

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ