गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

हवं ते मिळालं नाही की
आपण नशिबाला दोष देतो
हवं आहे ते मिळालं की 
आपण आपल्याच मस्तीत असतो 
प्रयत्नांची हवी पराकाष्ठा
हवे ते मिळवण्यासाठी 
विधाताही देईल आशीर्वाद
प्रयत्नांच्या पाठोपाठी 
वाट जिकडे जाईल तिकडे
आपण जायचं नसतं
आपल्या वाटानां वळण 
आपणच द्यायचं असतं
उगीचंच आपल्या स्वत्वाला 
कुठेही झुगारायचं नसतं 
मनातलं ठिकाण मिळालं तर
मागे मुळीच हटायचं नसतं 
नकोश्या माणसांमध्येही 
हवं ते शोधायचं असतं 
हव्याहव्याश्या मानसांना 
नित्य स्मृतीत जपायचं असतं 
काळ हा पुढेच जाणार 
गणित हे समजून घ्यायचं असतं 
आपल्या आयुष्याचं चित्र 
आपणंच रेखाटायच असतं 
जे नाही मिळाले त्यासाठी 
झुरत बसायचं नसतं 
प्रत्येक क्षणाचा आनंद लुटून 
आयुष्य महोत्सवासम जगायचं असतं

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ