क्षणांचा
कापूर होतो,
अन मनाची निरंजन होते..।
बंद मूठ ही कुबेर होवून,
क्षितीजाला
कवेत घेते..।।१।।
जिद्दीचे पंखही,
आकाशाकडे झेपावतात..।
क्षणांनाही उत्कटतेचे
,
नवे धुमारे फुटतात..।।२।।
मानससरोवराच्य ा
लाटाही
मौन धारण करतात..
शब्दही निःशब्द होवून,
बरचं काही
बोलतात..।।३।।
असेच तर बहरत जातात,
सस्नेहाचे बगिचे..।
फुलवत जावू या जीवन ,
स्वसोबत सकलांचे..।।४।।
-रो....
0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ