शनिवार, २१ मे, २०११


वाट..
वाट वळणाची असली  की,
खूपसं चांगलं असतं..
कारण वळून गेलं की,
मागचं काही दिसत नसतं..
अन पुढचं पाहण्याचं,
मात्र औस्तुक्य असतं..

सरळ वाटेचं दु:ख मात्र,
अगदी निराळच असतं..
तिचं तिलाच ते ठाऊक असतं     
मागचं तर सोडता येतचं नाही,
अन पुढे मात्र सारखं लक्ष ठेवावं लागतं..

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ