मंगळवार, ३ मे, २०११

आपली माणसं

आपली माणसं जेव्हा आपली असतात 
तेव्हा आपण सर्व जगाचे असतो,
आपली माणसं जेव्हा आपली नसतात 
तेव्हा आपण आपलेही नसतो..

आपली माणसं जेव्हा आपली असतात 
तेव्हा अक्षरांनाही भावनांचे  धुमारे फुटतात,
आपली माणसं जेव्हा आपली नसतात
 तेव्हा महाकाव्ये ही रुसून बसतात..

आपली माणसं जेव्हा आपली असतात 
तेव्हा निष्पर्ण शाखेलाही पानफुटी होते,
आपली माणसं जेव्हा आपली नसतात
तेव्हा गुलाबाचे उद्यानही  कोमेजून जाते..

असे असते आपलेपणाचे नाते 
मानवी जीवनाला मुक्ततेकडे नेते,
जपावे लागते ते हृदयाच्या कोंदणात
घेऊन जाते आपणास सुखसागरात..

ठेवा मनी विश्वास आपलेपणावर
घेवू नका मनी शंका कुणीकुणावर,
आणू या स्वर्गच आपण या धरतीवर 
उत्कटतेने जगू या चला क्षण न क्षण..   
   

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ