रविवार, १३ मे, २०१२

 
"बहर"
जो करत असतो प्रयत्न,
तोच तर चुकत असतो..
जो काहीच करीत नाही,
तो फक्त हुकत असतो..।

शिखर चढत असतांना,

मुल्यांचं अधिष्ठान हवं..
पायाचं असेल पक्का तर,
कळसाने कशाला भ्यावं..।

सदसदविवेकाचं बोट धरुन,
प्रत्येक पाऊल टाकायचं.. 
प्रवासात क्षणाक्षणाला,
मागे वळून पहायचं..।

नीतीमुल्यांनी आयुष्याला,
शाश्वततेचं रुप येतं..
नातं ही मग अतूट होवून,
अवघं जिवन बहरुन जातं..।।

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ