रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

वेदना..'
आसुडाचे वार,

सोसले कळ्यांनी..।
उमलण्याआधी निर्माल्य,
झाली शब्दवाणी..।।
आक्रंदन त्यांचे,
ऐकले ना कोणी..।
निस्तब्ध होत गेली,
आभाळ कहाणी..।।
हुंदके हंबरडे,
ना पोहचले कानी..।
मन-बुध्दी-आत्माही,
ठेविला गहाणी..।।
आता कैसी आळवावी,
सुरेल गाणी..।
येते फक्त भरुनिया,
डोळा पाणी..।।
आरोप-प्रत्यारोप उरले,
विश्वाच्या ठिकाणी..।
ती वेदनाचं झाली,
बहु ओशाळवाणी..।।
रो...

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ